तुलना
तुलना आपण का करावी?
चिऊच्या चिवचिवटाला,
कुहूच्या स्वरांची
अपेक्षा का धरावी?
सूर्याच्या तेजाने तळपणे
चांदोबाला कसे जमेल?
चांदण्याची शितलता लेऊन
भास्कराचे मन कसे रमेल?
पाणी पिऊन तृष्णा भागेल,
पोट कधी भरेल काय?
भरल्या पोटी उदकाशिवाय
तळमळ जीवाची हरेल काय!
निर्मात्याने ऋतू नेमले
दिवस रातीचे चक्र निर्मिले
गुण आणि धर्माच्या साथीने
सृष्टीने चराचर स्थापिले!
प्रत्येकाचे गुणधर्म न्यारे..
रंगूनी रंगात सारे,
जाणावा जिवनाचा अर्थ
सोडूनी विवंचना व्यर्थ!
- अनुप अशोक पवार
दि.23-7-2016
शनिवार